खोटाच होता श्वास त्याचा, खोटीच होती स्पंदने,
खोटाच होता भाव त्याचा, ख़ोटीच होती बंधने.
खोटाच होता श्वास त्याचा, खोटीच होती स्पंदने,
खोटाच होता भाव त्याचा, ख़ोटीच होती बंधने.
भंगले ते स्वप्न माझे, तू असा हसलास का रे?
रातराणीच्या फुलाला तू असा चुरलास का रे?
मीच होते प्रेमवेडी, तू असा भिनलास का रे?
राखरांगोळी करूनी तू असा उरलास का रे?
खेळ होता तो घडीचा, तू असा शिणलास का रे?
डाव माझा मांडुनीया तू असा उठलास का रे?
वाट थोडी पाहुनिया, तू असा विटलास का रे?
बेगडी फुलपाखरांना, तू असा भुललास का रे?
याद चाणक्या कुणाची? तू अशी पुसलास का रे?
तोडुनिया बंध सारे, तू असा झुरलास का रे?
हे ही गेले ते ही गेले,
मजसाठी जे माझे होते,
ते सर्वकाही गेले…
भुतकाळ सुखाचा,
वर्तमान चुकीचा,
भविष्य तो कुणाचा?
ते स्वप्न सुखांचे,
ते सर्वकाही गेले…
का गुंतलो मी?
का भांडलो मी?
का भंगलो मी?
जे माझे होते म्हणुन होते,
ते सर्वकाही गेले…
हे ही गेले ते ही गेले,
स्वप्नात पाय होते,
सत्यात शुन्य होते,
ते सत्य गेले,
ते स्वप्न गेले
जे जे म्हणेन मी माझे,
ते सर्वकाही गेले…..
बांधले मंदिर त्यांनी, मीच त्यांचा देव नाही!!
मंदिरी या भावनांना आज काही भाव नाही!!
आरत्या ओवाळल्या जरी अन किरीट घातले!!
दैवताच्या मानसाचा माणसांना ठाव नाही!!
घेतले मम नाम किती, अन डाव तुम्ही मांडले!!
भावनांना आज माझ्या या सम असा हा घाव नाही!!
जिंकला तो धर्मराज अन तुम्हा कौतुक असे!!
आजही आत्म्यास त्याच्या, स्वर्गी त्या शिरकाव नाही!!
देवतांच्या कल्पनेचा आज कोणा ठाव नाही!!
तो म्हणे चाणक्य वेड्या भावनेला गाव नाही!!
श्वास घेतला मी, पण त्यात जीव नाही येत,
आठवणींचा पुर ही आटला, पण तू नाहीस येत
आठवणीच त्या, त्या काही ठरवून नाही येत,
वाईटा सोबत चांगल्याही आल्या, पण तू नाहीस येत
रोज मी चंद्र पाहतो, तो ही एक दिवस नाही येत,
रोज तो मला चिडवतो, पण तू नाहीस येत
वाट पाहू किती मी?, आता श्वास नाही मी घेत,
प्रत्येक श्वासात आठवण तुझी, पण तू नाहीस येत
अरे, चाणक्या, प्रेम असं मोजता नाही येत,
झुरलास किती ही जरी, तरी ही ती नाही येत